नमस्कार मित्रांनो, नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो … “हाय, गुड मॉर्निंग डियर” (मेसेज फ्रॉम बेबी) सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते आणि विचारात पडते, ही “बेबी” कोण आता…? नवरा बा थरूममधून आल्यावर बायको त्याला कोणत्या बेबीचा मेसेज आला आहे हे सांगते. नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, “हाय बेबी, हाऊ आर यु ?” आणि आपल्या कामाला लागतो.
तो ही रिप्लाय बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात हाच विचार सुरू राहतो, कोण असेल ही बेबी ? संध्याकाळी नवरा घरी आल्यावर ती त्याला विचारते, “ही बेबी कोण आहे हो ?” नवरा फक्त हसतो आणि उत्तरं न देता आपल्या कामात लागतो. असेच एक दोन दिवस जातात. एके सकाळी परत मेसेज येतो, “हाय, आज तरी भेटणार का ? खूप आठवण येतेय तुझी” (मेसेज फ्रॉम बेबी) पण हे वाचून बायकोच्या मनात संशय वाढू लागतो.
अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज येत असायचे, नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय अधिकच वाढला. त्यात एकेदिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात. शेवटी त्या संशयाचे रूपांतर प्रचंड रागात होते. दोघात अतिशय मोठ्याने भांडण होते. तिच्या मनात असणारा संशय त्यात भां डण पे टलेले.
त्या रा गाच्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते “मी घर सोडून माहेरी जातेय, कायमची” नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !! असेच पंधरा दिवस जातात आणि एकेदिवशी आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी बायको राहत असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते. दारात पाच वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते!! ती विचारते, “अमुकच्या मिसेस तुम्हीच ना ?”
बायको “हो” म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते आणि बायको पत्र वाचू लागते. “प्रिय सखी, ज्या “बेबी”वरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच ही “बेबी” आहे. जिने आता तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि “ही बेबी कोण आहे?” तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया.
मात्र तुझा “बेबी संशय” वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस” आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे”
थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !! आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुं गीचं औ षध दिलेलं आणि नंतर “नको ते कृत्य” केलेलं. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही अबॉ र्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं.
तुझे वडीलच डॉ क्टर असल्याने फारसा बोभाटा न होता “नको” ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वै वाहिक जी वनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी गावातल्या अनाथ आ श्रमात सोडून दिलेलं ! तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा र डताना पाहिला असशील किंवा वडिलांकडून खात्री करून घे.
बायको पटकन जाऊन त्या मुलीच्या खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून तुटते. डोळे भरून आलेले पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे वाचायला सुरुवात करते “आता हे सगळं मला कस माहित ? तर तुझ्या पापभिरू वडिलांना राहवले नाही म्हणून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सगळं सांगितलं आणि वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, अस सुचवलं.
तरीही मी तुला स्वीकारलं कारण झालेल्या प्रकारात तुझी काहीच चूक नव्हती आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो, तिच्या सहवासात छान वाटायचे. लळा लावला होता पोरीने. माझे सगळं सांगून संपलंय! आता विचार कर आणि जर पुन्हा तुला परत यायचं असेल तर आणि तरच ग्यालरीत ये” बायको धावत धावत ग्यालरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा अगदी शांतपणे हसतमुख उभा असतो आणि इकडे हिच्या डोळ्यातुन अश्रूचा महापुर येत असतो.
कोणतेही कारण असो, दोघांमध्ये सं शयाला कधीच थारा देऊ नका !! शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात “संशय” हा एकमेव असा रो ग आहे, ज्यावर अद्याप औ षध निघालेले नाही !! त्यावर औ षध एकच… नात्यात वा द नको संवाद ठेवा. ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लोकरा, ला ईक करा आणि शे अ र करायला विसरू नका.