नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि रामायण हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारे महाकाव्य आहे. रामायण ही कथा आपण लहानपणापासून वाचत, ऐकताना पहात आलो आहे. बऱ्याच जणांना ही एक काल्पनिक कथा आहे असे वाटते पण आजच्या कलयुगातही रामायणाच्या वास्तव्याचे परिणाम दिसून येतात.
1 अशोकवाटिका – जेव्हा रावणाने सीतेचे अपह रण केले तेव्हा सीतेने रावणाच्या लंकेत राहण्यास नकार दिला, तेव्हा रावणाने सीतेला अशोक वाटीकेमध्ये ठेवले होते. अशोक वाटिकेमध्ये अशोकाची झाडे भरपूर असल्याने त्याला अशोकवाटिका म्हणतं. सध्या स्थितीमध्ये ही रोपवाटिका श्रीलंकेत चिताळ हिरिया येथे आढळून येते.
2 गरम पाण्याच्या विहिरी – रामायणात असा उल्लेख आहे की रावणाने मंदिराच्या सभोवताली गरम पाण्याच्या विहिरी बांधल्या होत्या त्याचे अस्तित्व श्रीलंकेतील कनिया या ठिकाणी आजही आढळते. श्रीलंकेत बारा महिने गरम पाणी मिळवण्याचा हा स्त्रोत आहे.
3 जटायू मूर्ती – रावणाने सीतेचे अपह रण केले त्यावेळेस सीतेला लंकेत नेत असताना जटायू पक्षीने रावणाला विरो ध केला होता. रावणासोबत झालेल्या सं घर्षामुळे जटायू गं भीर रीत्या ज खमी होऊन ज्या पर्वतावर कोसळतो तो पर्वत आजही केरळ येथे अस्तित्वात आहे, तेथे जटायूची मूर्ती आहे जी जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती मानली जाते.
4 हनुमानाची पावले – श्रीलंकेमध्ये सितामातेचे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला पाण्याचा झरा आहे, त्या ठिकाणी सीता माता स्नान करत असे अस म्हणतात. त्या झऱ्याच्या बाजूला खडकावर हनुमानाची पावले आजही दिसून येतात. त्याचबरोबर जवळच असणाऱ्या पर्वतावरही हनुमानाची पावले दिसतात.
5 लंका द हनाचा पुरावा – रामायणात सांगितल्याप्रमाणे हनुमानाने लंका द हन केले होते. ज ळालेली ती लंकेची जागा आजही श्रीलंकेत आहे, तेथील माती पूर्णतः काळ्या रंगाची असून तो भाग सोडून सभोवतालची माती श्रीलंकेच्या नैसर्गिक मातीप्रमाणे आहे.
6 रामसेतू – रामसेतू हा भारत व श्रीलंकेच्या दरम्यान आजही दिसून येतो. नासातील संशोधकांनी यावर संशोधन केले असून हा पूल प्राचीन व निसर्ग निर्मित असण्याचे मान्य केले आहे. हा पूल बांधण्याचा कालावधी व रामायणाचा कालावधी हा सारखाच दिसुन आलेला आहे.
7 तरंगणारे दगड – रामायणात उल्लेख केल्याप्रमाणे सेतू बंधण्याकर्ता वापरणारे दगड हे पाण्यावर्ती तरंगत होते. सध्या स्थितीमध्ये श्रीलंकेत पाण्यावर तरंगणारे दगड दिसून येतात जे वजनाने भारी असूनही बुडत नाहीत. असे का होते याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांनी शोध लावून ही योग्य निष्कर्ष निघाला नाही.
8 संजीवनी पर्वत – रामायनानुसार लक्ष्मणाला संजीवनी देण्याकरिता हनुमानाने हिमालयात असणारे, संजीवनी पर्वत उचलुन आणले. श्रीलंकेतील हिरीपिटिया या खेडेगावी दोंकुंडा या नावाने आजही तो पर्वत आढळतो. विशेष म्हणजे या पार्वतावरील वनस्पती, वृक्षांचे गुणध र्म हे हिमालयातील वनस्पतीप्रमाणे आहेत. श्रीलंकेत दुसऱ्या ठिकाणी अशा वनस्पती आढळून येत नाहीत.
9 प्राचीन गुहा – हनुमानाने लंका द हन केल्यानंतर रावणाने सितामातेला अशोक वाटीकेतून काढून एका गु प्त गुहेत ठेवले होते, ती गुहा श्रीलंकेच्या पूरातत्व विभागाला सापडली असून संशोधकांनी त्याला कोब्रा हुडस हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे या गुहेत नक्षीकाम व चित्रे आढळतात जी स्त्रियांची आवडी लक्षात घेऊन केलेल्या दिसतात. त्यामुळे रावणाने सीता मातेला त्या गु हेत ठेवले होते ही पुष्टी मिळते.
10 रावण महल – श्रीलंकेच्या पुरातत्व भागाला असा एक महल सापडला आहे, जो रामायण काळातील आहे असं म्हणल जातं. या महालाच्या बाजूने अशा गोष्टी सापडल्या आहेत, जे रामायनकालीन आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे या महालातून गु प्त गुहेत जाणारा एक गु प्त मार्ग सापडला आहे. शहराच्या विविध भागांतील मार्ग हे या महलाकडे जाताना आढळून आले आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉलो करा.