मंडळी महाभारत त्यामधील अनेक कथा आपल्याला माहित आहेतच. कौरव, पांडव, भीष्माचार्य, विदुर, युधिष्टिर ,गांधारी या सगळ्या बद्दल आपल्याला माहिती आहेच. द्यूत खेळताना सर्व काही हारल्यामुळे पांडवाना द्रौपदी वस्त्रहरणाला सामोरे जावे लागले होते, तेव्हा श्रीकृष्णाने तिचे रक्षण केल्याची कथा आपण ऐकली आहे.
पण त्यानंतरही पांडवांना वर्ष वनवास आणि १ वर्षाच्या अज्ञातवासाच्या शि क्षेला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी वनवासात राहून पाचही पांडवानी पुढील यु द्धाच्या तयारी साठी क ठोर मेहनत घेतली होती. अर्जुनाने सुद्धा घोर तपश्चर्या करून अनेक देवांना प्रसन्न करू घेतले होते. त्याला अनेक अ स्त्रे व ते चालवण्याचे ज्ञान दिले होते.
पण उर्वशीने मात्र अर्जुना शाप दिला होता. असे का बर झाले असेल? अर्जुनाने अशी कोणती चूक केली म्हणून त्याला शाप मिळाला? व त्या शापाचे काय परिणाम झाले? तर याचं बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, तर आपणांस कदाचित माहित असेल कि अर्जुनाला देवांना प्रसन्न करण्यासाठी वेद्व्यासांनी सांगितले होते.
त्यासाठी त्याने घोर तपश्चर्येस प्रारंभ केला. एका सुंदर वानर अर्जुन शंकरांची साधना करत होता. तेव्हा अर्जुनाची परीक्षा घ्यावी म्हणून भगवान शंकर एका भिल्लाच्या रुपात वनात आले, तेव्हा त्यांनी पहिले कि एक दैत्य शुकराच्या रुपात तेथे आला आहे व तो अर्जुनाला मा रणार आहे. म्हणून त्यांनी त्या राक्षसावर बाण सोडला त्यावेळी अर्जुनाची तपश्चर्या भं ग झाली.
आणि त्याने सुद्धा आपले धनुष्य उचलून राक्षसावर बाण सोडला आणि त्यामध्ये त्या राक्षसाचा मृ त्यू झाला. तेंव्हा भिल्ल रूपातील शंकर व अर्जुन यांच्यात वा द सुरु झाला दोघांचेही म्हणणे होते कि आपल्या बाणामुळे राक्षसाचा मृ त्यू झाला आहे. या वा दाचे रूपांतर हळूहळू युद्धामध्ये झाले. अर्जुन त्याच्यावर अनेक बाण चालवत होता मात्र त्या भिल्लावर त्याचा काही परिणाम झाला नाही.
त्याने मा रलेले सर्व बाण जमिनीवर गळून पडले. थोड्या वेळाने अर्जुनाचे सगळे बाण संपले, म्हणून त्याने तलवारीने त्या भिल्लावर हल्ला केला. तेव्हा ती तलवार भिल्लाच्या शरीराला लागताच दोन तुकडे होऊन खाली पडली. अर्जुनाने बळाचा वापर करायला सुरवात केली, पण भिल्लाच्या एका प्रहारानेच अर्जुन बेशुद्ध पडला.
मात्र अर्जुन जेंव्हा शुद्धीवर आला तेव्हा भिल्ल त्याच्यासमोर हसत उभा असल्याचे पाहून अर्जुनाला खूप रा ग आले त्याने त्या भिल्लाला मारण्यासाठी महादेवाची प्रार्थना केली,व शिवलिं गावर फुलाची माळ घातली. ती माळ शिवलिं गावर न पडता भिल्लाच्या गळ्यात पडली. तेव्हा अर्जुनाला समजले कि हा भिल्ल नसून साक्षात शंभू महादेव आहेत, तेव्हा त्याने त्या भिल्लाला वाकून नमस्कार केला.
मग शंकरांनी आपले मुळरूप धारण केले व अर्जुनाला सांगितले कि, मी तुझ्या साधनेने प्रसन्न झालो आहे. असे सांगून त्याला पशुपत्यास्र दिले. त्यानानात्र कुबेर, इंद्र, वरून, गंधर्व, यम यांनी देखील अर्जुनाला वेगवेगळी अ स्त्रे दिली. तसेच इंद्राने अर्जुनाला सांगितले होते कि, तुला माझा सारथी न्यायला येईल. आणि काहीवेळाने इंद्राची सारथी मालती तेथे आली व अर्जुनाला घेऊन इंद्राची नागरी अमरावती येथे गेली.
तिथे अर्जुनाने दिव्यास्त्र कसे चालवायचे याचे शिक्षण घेतले. त्यानंतर इंद्राने अर्जूनाला चित्रसेन नावाच्या गंधर्वांकडून नृत्य व संगीत शिकून घेण्यास सांगितले, एक दिवस अर्जुन नृत्य शिकत असता इंद्राची अप्सरा उर्वशी तेथे आली, तिला अर्जुनाची भुरळ पडली संधी मिळताच तिने अर्जुनाला सांगितले कि हे अर्जुना तुला पाहून माझी काम वा सना जागृत झाली आहे.
म्हणून तू माझी काम वा सना पूर्ण कर, यावर अर्जुन म्हणाला, हे देवी, तुम्ही मला माझ्या आईप्रमाणे आहात, पुरू वं शातील राजांनी आपल्याशी वि वाह करून आमच्या घराण्याची शान वाढवली आहे. आपण पुरू वं शाची जननी आहात. असे म्हणून अर्जुनाने तिला नमन केले. हे ऐकताच उर्वशी क्रोधीत झाली व तिने अर्जुनास न पुंसक म्हणून हिणवले.
तू न पुंसक आहेस म्हणून असे विधान करत आहेस. तू एक वर्ष न पुंसक राहशील असा शाप मी तुला देते. असे म्हणून ती तेथून निघून गेली. देवराज इंद्रना जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा त्यांनी अर्जुनाची समजूत घातली आणि त्याला सांगितले कि तुझे हे वागणे तुझ्या जागी योग्यच आहे, परंतु उर्वशीचा हा शाप हि तर देवांची इच्छा आहे.
हा शाप तुला तुझ्या अज्ञातवासात उपयोगी ठरेल. त्यानंतर तुला तुझे तारुण्य परत मिळेल. जेव्हा वनवास संपून पांडव १ वर्षाच्या अज्ञातवासात होते तेव्हा त्यांचे वास्तव्य विराटनगरीचा राजा विराट यांच्याकडे राहत होते. तेव्हा अर्जुन विराटराजाची मुलगी उत्तरा हिला नृत्य शिकवत असे. या अज्ञातवासानंतर उत्तराचा वि वाह अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू सोबत झाला. अशा प्रकारे उर्वशीचा शाप अर्जुनास उपयोगी ठरला