“मी असेपर्यंत येत रहा” वडील जेव्हा मुलाला म्हणतात आणि मुलगा जे करतो ते पाहून डोळ्यात पाणी येईल..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, मी असेपर्यंत येत रहा, अगदी काळजात धस्स करणार वाक्य. उभ्या आयुष्यात कधीही न झुकलेला, न थकलेला, हार-जीत, ऊन-पाऊस सगळं धीराने पचवलेला माझा बाप आज बेडवरून उठू शकत नाही. सून- मुलगा करतात सगळं, पण त्यांना नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य, की प्रेम माहीत नाही.

सासरी गेलेल्या लेकी या त्यांच्या जगात व्यस्त आहेत, नाही म्हणायला पाच-सहा दिवसात व्हिडीओ कॉल करतात आणि बाबा म्हणतात मी असेपर्यंत येत रहा. डोळ्यातून अश्रूं वाहत असतात. अगदी जन्म झाल्यापासुन दवाखान्यातुन घरी आणणारा, रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप, शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप, सायकल शिकवताना हो जमतय जमतय बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ म्हणुन अचानक हात सोडुन आ त्मविश्वास वाढवणारा बाप.

कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारा बाप, स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा, बाहेरची घोंघावणारी वादळे स्वतःच आडवणारा बाप आपल्याला नेहमी हसताना दिसतो. आपल्या जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके, कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतो.

नोकरी, छोकरी आपल्याला मिळते पण आभाळाएवढं कौतुक त्याला असत. आपल्या पहिल्या पगारातुन आपण त्याला घेतलेला शर्ट, घड्याळ, साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतो. कौतुक करतच राहतो. आई रागावली की आपला बचाव करायला नेहमी उभा असतो. करु दे ग तिला तिच्या मनासारखं अस म्हणतो खर पण आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो.

मुलीच-मुलाचं लग्न ठरलं की तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो. काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या अस हात जोडुन सांगणारा बाप, मुलीला सासरी कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मुलीच्या सासरच्या सर्व मंडळींना मान-सन्मान देणारा, मने सांभाळणारा बाप सगळ्यांनाच माहीती आहे. पण त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई वडिलांना, काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा ही बापच असतो.

तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. म्हणुनच, बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा अस गॉसिपींग करणाऱ्या सुना घरोघरी दिसतात. सुन आणि सासऱ्यात ठिणगी स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा सं घर्ष कधीच नसतो. समजा पत्नी अगोदर गेली तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो.

मग नातवांना पाढे कविता श्लोक, गीता शिकवण्यात रमतो. आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो. कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो. मागे सुटलेले, विस्कटलेले, बिघडलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो. कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो, काही नाही बर आहे ना सगळं, सहजच फोन केला गं म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो.

मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई, मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा. आ जार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत. घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात. त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप.

बाप गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी या तना होते. भाऊ ,वहिनी, भाच्या, भाचे सगळ मनापासुन करतात नणंदेच माहेरपण. ती ही दुःख विसरुन सगळ्यांवर बाबाचं पांघरुण घालते. पण ती सल, ती उणीव कुठेतरी आत जाणवत रहाते. म्हणून कोणतेही काम असो सर्व सोडून बाबांना भेटा.

सुरकूतलेल्या हातांवरून परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या. सांगा, हो बाबा मी तुम्ही असेपर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेल तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *