आपल्याला माहित असेल कि जमशेदजी टाटा हे टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. जमशेदपूर येथील पो लाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इ न्स्टिट्यूट ऑफ सा यन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.
त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आ र्थि क सं क टांशी झ ग डत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.
आपल्याला माहित असेल कि जमशेदपूर हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आ ग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या अगदी जवळ आहे. तसेच १९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली.
आणि तेव्हापासून खरं या शहराला खरी ओळख आणि नाव मिळाले. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले आणि १९१९ मध्ये लॉ र्ड चे म्स फर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. तसेच आपणास सांगू इच्छितो कि आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस म्हणून येथे या शहराचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
चला तर मग आज आपण शहराचा इतिहास आणि हे शहर कसे उदयास आले ते जाणून घेऊया. भारतातील स्वदेशी उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी १८८० साली स्टील उद्योग उभारण्याची कल्पना मांडली आणि मग तेव्हा जमशेदजी सें ट पि ट्स बर्ग मध्ये असताना भू ग र्भशा स्त्री ‘चार्ल्स पेज’ यांनी साक्ची हे गाव स्टील उद्योगासाठी सर्वात आणि विकासासाठी फा य दे शी र असल्याचे सांगितले.
त्यानंतर १९०८ साली 46632 रु पयांमध्ये टाटांनी साक्ची आणि आसपासची जवळजवळ 3584 एकर ज मीन वि कत घेतली आणि तिथे स्टील कंपनीची सुरुवात केली आणि आपल्या भारताच्या आधुनिक क्षेत्राचा पहिला पाया रचला. २ त्यानंतर जानेवारी १९१९ आली तत्कालीन वायसरॉय ‘लॉर्ड चैम्सफोर्ड’ साक्ची येथे आले होते.
त्यावेळी त्यांनी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीपित्यार्थ साक्चीचे नाव बदलून ‘जमशेदपूर’ असे ठेवले तसेच ‘कालीमाटी’ रेल्वे स्टेशनचे नाव बदलून टाटानगर असे करण्यात आले आणि आपणास सांगू इच्छितो कि या नामकरणाला आज ९८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
आज त्याच्या या योगदा नाने आणि प्रेरणेने मोटारी, रसायने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कापड,यं त्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचे कारखाने उभे राहिले. तसेच ३ डिसेंबर १९०३ मध्ये त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी ताज या हॉटेलची स्थापना केली आणि त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारं ते एकमेव हॉटेल होतं. परंतु १९ मे १९०४ ला जमशेदजी टाटा याचे निधन झाले पण तोपर्यंत भारतीय उद्योगजगताचे पितामह म्हणून ते जगभर विख्यात झाले होते.
जर आपल्याला सुद्धा जगभरात भारताचे नाव अभिमानाने घ्यायला लावणाऱ्या आणि आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या जमशेदजी टाटा सारख्या भारत रत्नांचा अभिमान असेल तर त्याचे हे कार्य आपण शे अ र करून आपल्या प्रियजनांना सुद्धा नक्की पाठवा आणि त्याच्या या कार्याचा सन्मान करा.