सिद्धी आणि सुशांत बरेच वर्ष एकत्र होते. अगदी कॉलेजपासून त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि आता पुढे नोकरीसाठी ते दोघे पुन्हा एकाच ठिकाणी होते. त्यांचा एकमेकांशी चांगला संवाद होता आणि त्यामुळेच त्यांच्या मैत्रीने हळू हळू एकेक पाउल पुढे टाकायला सुरवात केली होती. त्यामुळे मग ऑफिस सुटल्यानंतर एकमेकांना भेटन ,कधी एकत्र कॉफी तर कधी डिनर डेट अश्या गोष्टी त्यांच्यामध्ये नेहमीच होत असत.
सुट्टी दिवशी सुद्धा वर्क लोडचा बहाणा करत दोघे एकमेकांना भेटत असत मग त्यांच्या मध्ये तासान तास गप्पा व्हायच्या, कधी छोट्या मोठ्या कुरबुरी पण होत असत, पण त्या तेवढ्या वेळे पुरत्याच त्यानंतर मात्र पुन्हा सगळ काही सुरळीत, तर त्यादिवशी देखील सुशांत असाच वैतागून तिला सारखा फोन करत राहिला होता, अग सिद्धी आहेस कुठे तू? किती वेळ वाट पाहत आहे तुझी…
हे बघ मी तुझ्या मागेच आहे. सिद्धी हळुवार आवाजात त्याच्या कानात बोलून गेली. तिचा मधुर आवाज ऐकून तो पार वितळून गेला. किती वाट बघायची ग मी? तो लटक्या रा गात बोलून गेला. अरे बाबा होते ना घरी सो बाहेर पडायला थोडा उशीर झाला. हम्म साजीक आहे चल आता लवकर. त्याने तिला त्याच्या गाडीवर बसायची खून केली.
आज कुठे जायचय? तिने त्याला विचारल. अग बस तर आधी सांगतो तुला, अस म्हणून त्याने बाईक चालू केली. सुसाट धावत त्याची बाईक एका इमारती पाशी येऊन थांबली, तो तिला वरती घेऊन आला. एका अलिशान फ्लॅटचा दरवाजा उघडून दोघे आत गेले. सुश…हे कोणाच घर आहे? अग माझ्या एका मित्राचा फ्लॅट आहे हा. खूप मस्का मारून त्याच्याकडून किल्ली घेतली आहे.
अस सांगून त्याने तिला जवळ ओढल. सुश काय करतोय..ती लाजत म्हणाली. तेच जे बरेच दिवस करायचं राहून गेल. आपल्याला इथे मस्त प्राय व्हसी आहे. ती बाजूला झाली, हे सगळ आपण लग्नानंतर करणार आहोत असा ठरलाय ना आपल सुश..मग आत्ता…तो तिच्या जवळ गेला, तिला मागून घट्ट मिठी मा रली आणि आपल्याकडे चेहरा करून तिच्या ओठांच दीर्घ चुं बन घेतलं आणि हळू हळू तिचे क प डे का ढू लागला.
या आधी पण असे क्षण त्यांच्या मध्ये अनेकदा घडले होते. पण दोघेही मर्यादा ठेऊन वागू लागले होते. आज सुशांतचा मूड काही वेगळाच होता. सुश आपण लग्नांनंतर हे करणार आहोत. मला आता नाही जमणार हे सगळ, असं म्हणून ती बाजूला झाली. त्याने तिला पुन्हा जवळ खेचल. अस असेल तर अस समज कि आपल लग्न झालंय. बघ सिद्धू आपण एकमेकांशी लग्न करणारच आहोत ना. मग आता केल्याने काय फरक पडतो?
त्याने आता जबरदस्ती करायला सुरवात केली. ती त्याला फारवेळ नाही म्हणू शकली नाही. हे सुख अनुभवत असताना दोघेही हरखून गेले. दोघेही एकमेकात गुंतून गेलेआ णि असे क्षण दोघांमध्ये पुन्हा पुन्हा येऊ लागले. काही दिवसांनी सुशांतने आपली नोकरी बदलली. तरी सुद्धा दोघे एकमेकांना भेटत राहिले एकमेकांसोबत वेळ घालवत होते. काही सुशांतला काही दिवसांसाठी बाहेर गावी जावे लागणार होते, तसे त्याने सिद्धीला सांगितले.
तिला तर आता त्याच्याशिवाय राहणे जमत नव्हते, पण काही इलाज देखील नव्हता म्हणून ती काही बोलली नाही. तिकडे जाऊन सुद्धा फोन, मेसेज करत राहा अस त्याने तिला सांगितलं. सुरवातीला काही दिवस त्याचा तिला रोज फोन येत होता. पण अचानक त्याचे फोन कमी झाले. तिने केलेले फोन सुद्धा तो उचलेना झाला. काय बिनसलंय तिला काहीच कळेना.
ती त्याच्या पर्यंत पोचायचा प्रयत्न करू लागली पण काहीश होत नव्हत. अचानक तिच्या मैत्रिणीने तिला ऑफिसमध्ये एक क्लीप दाखवली. तीच क्लीप जेव्हा सुशांत पहिल्यांदा तिला घेऊन मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. तिला काय करू कळेना, ऑफिसमध्ये सर्वांच्या नजरा आता तिला खाऊ लागल्या, येणारे जाणारे लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. तिने हताश होऊन आपल्या हाताची न स का पून घेतली.
मंडळी ती क्लीप कोणी केली, का केली हा वेगळा भाग आहे. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि आपण कोणतीही गोष्ट करत असताना विश्वास कोणावर ठेवायचा? आणि कुठल्या दबावाखाली येऊन कोणाला हो म्हणायचं ते हि कोणत्या गोष्टीसाठी. कारण काही क्षणांची मजा हि पुढे आयुष्यभराची सजा बनते. म्हणूनच सावध राहा.