नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि दक्षिण भारतातील प्रसिद्ध असणारे तिरुपती बालाजीचे मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात आहे आणि हे मंदिर फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात बालाजी देवाची पूजा केली जाते. अस म्हणलं जात या मंदिरात बालाजीसोबत त्यांच्या पत्नी पद्मावती सोबत निवास करतात. जगभरात तिरुपती बालाजी मंदिर हे खुप प्रसिद्ध मंदिर आहे.
जितकं हे मंदिर श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे तितकंच रहस्यमय ही आहे. भगवान तिरुपती बालाजीला व्यंकटेश्वर, श्रीनिवास आणि गोविंदाच्या नावाने ओळखले जाते. तसेच बालाजीला श्री विष्णूचा अवतार मा नले जाते. या मंदिराचा इतिहास पाचव्या शतकापासून सुरू झाला होता. बालाजीच्या मूर्तीला कोणीही बनवले नाही, ही मूर्ती इथे स्वतः प्रकट झाली होती. ही मूर्ती दगडाची जरी असली तरी ती जिवंत मूर्ती असल्याप्रमाणे दिसते.
या मंदिरात केस दानाची प्राचीन परंपरा आहे इच्छा पूर्ण झाल्यावर लोक इथे केस दान करतात. या मंदिरात रोज वीस हजाराहून जास्त लोक केस का पतात तर तीन लाख हुन अधिक तुपाचे लाडू बनवले जातात. या मंदिरात अनेक लोक आपली इच्छापूर्ण करण्यासाठी येतात आणि देणग्यांमध्ये सोने, चांदी, पैसे अर्पण करून जातात. या मंदिराची बँकेत 1200 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे.
यामुळें दरवर्षी 800 कोटींपेक्षा जास्त व्याज म्हणून मंदिराचे उत्पन्न आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील टॉप रहस्यमय मंदिरामध्ये येते. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करू त्यावेळी आपल्याला बालाजीची मूर्ती ही ग र्भगृहात मध्यभागी दिसते पण आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा असे वाटते की ही मूर्ती उजव्या बाजूला उभी आहे. आणि उजव्या बाजूला मूर्ती दिसने हे शुभ संकेत असते.
या मंदिरातील अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या ग र्भगृहात एक दिवा शेकडो वर्षांपासून जळत आहे आणि यामध्ये आतापर्यंत कोणतेही इंधन टाकलेले नाही तरीही तो दिवा विजत नाही. तो दिवा कोणी आणि केव्हा लावला होता हे ही एक रहस्यच आहे. असही म्हणलं जात की या मूर्तीच्या डोक्यावर जे केस आहेत ते एका जिवंत व्यक्तिप्रमाणे आहेत.
हे केस कधीच गुंतत नाहीत आणि कधीही खराब होत नाहीत. श्रद्धाळू अस म्हणतात की देव स्वतः इथे वास करतात. मंदिरातील पुजारीचं अस म्हणणं आहे की मूर्तीला आपण कान लावला तर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. समुद्राच्या लाटांचा मूर्तीशी काय सं बं ध आहे हे ही एक रहस्य आहे.
दर गुरुवारी बालाजीच्या मूर्तीला स्नान घालून नंतर चंदनाचा लेप लावला जातो. पण जेव्हा लेप लावून काढला जातो तेव्हा हृदयावर लावलेल्या चांदनावर माता लक्ष्मीची आकृती दिसते अस मानलं जातं की बालाजीच्या हृ दयात लक्ष्मी देवीचा निवास आहे. मंदिराचे बांधकाम आशा पद्धतीने केले आहे की तिथले वातावरण थंड आणि शांत राहते.
पण तरीही देवाच्या मूर्तीला घाम येतो आणि मूर्तीचा नम पणा हे ही एक रहस्य आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छडी आहे, असं म्हणल जात की लहानपणी बालाजीना त्या छ डीने मा रले जात होते आणि त्यामुळे त्यांच्या हनुवटीवर एक जखम ही झाली होती आणि आजही ती ज खम त्या मूर्तीवर दिसते म्हणून तेथे लेप लावला जातो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉ लो करा.