भारतात काशीविश्वेश्वरला अत्यंत पवित्र स्थान मा नले गेले आहे. काशीला जाऊन आल्यानंतर आपली सर्व पापे धुतली जातात असे लोक मानतात. तसेच काशी मध्ये म रण पावल्यानंतर पुनर्जन्म नाही असे सुद्धा लोक म्हणतात. काशी हे अत्यंत शुद्ध, पवित्र स्थान आहे. ते ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सातवे ज्योतिर्लिंग काशी येथे आहे. काशीचे आधुनिक नाव वाराणसी हे आहे. असे मानले जाते की काशी हे शहर जगातील तीन सुंदर शहरांपैकी एक आहे. येथे भगवान शंकराचा त्रिशूल ठेवण्यात आला आहे. विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेश मधील काशी म्हणजेच वाराणसी येथे आहे. या काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती आता आपण पाहू या…
विश्वनाथ ज्योतिर्लिंग ची स्थापना कशी झाली:- पौराणिक कथेनुसार भगवान शंकर यांनी पार्वती देवीशी वि वाह केला. आणि त्यानंतर कैलास डोंगरावर येऊन वास्तव्य करण्यास सुरुवात केली. देवी पार्वती लग्नानंतरही तिच्या वडिलांच्या घरी राहत होती. ही गोष्ट तिला मुळीच आवडत नव्हती. एके दिवशी पार्वती देवीने भगवान शंकर यांना सांगितले की आपण मला आपल्या घरी घेऊन चला.
तुमच्याशी विवाह करून सुद्धा मला माझ्या वडीलांच्याच घरी राहावे लागते. मला इथे राहणे आवडत नाही. सर्व मुली वि वाह झाल्यानंतर आपल्या पतीच्या घरी जातात आणि मला इथेच राहावे लागते. असे पार्वतीदेवी आपले पती म्हणजे भगवान शंकरांना सांगते. मग भगवान शिव यांनी पार्वतीचे शब्द स्वीकारले आणि आपल्याबरोबर पवित्र नगरी काशी येथे तिला घेऊन आले.
येथे येऊन त्यांची स्थापना विश्वनाथ ज्योतिर्लिं गच्या रूपात झाली असे म्हणतात की या ज्योतिर्लिं गाला भेट दिली तरच मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. जर एखादा भ क्त दररोज त्याच्याकडे येत असेल तर भगवान शंकर आपला योगाचा सर्व भार स्वतःवर घेतात. असा भक्त या शिवशंकराच्या निवासस्थानाचा अधिकारी बनतो. तसेच शिवाची कृपा नेहमी त्याच्यावर कायम राहते.
अशी ही श्रद्धा आहे की भगवान वि श्वनाथ स्वतः म रण पावत असताना आपल्या सर्वोच्च भक्तांना तारका मंत्राचा पाठ करतात, तसेच दुसऱ्या एका कथेनुसार, असे सांगितले जाते की महाराज सुदैवाचा मुलगा राजा देविदास यांनी गंगेच्या काठावर वाराणसी शहर वसवले होते. एकदा भगवान शंकरांनी पहिले की पार्वतीदेवी आपल्या मातृभूमीत म्हणजेच हिमाचल प्रदेश मध्ये राहण्यास सं कोच करत आहेत.
म्हणून त्यांनी इतर काही सिद्ध क्षेत्रात राहण्याचा विचार केला. त्यांना काशी खूपच आवडली आणि ते तेथे आले. भगवान शिव यांच्या सहवासात राहण्याची इच्छा असल्यामुळे इतर देवता देखील काशी मध्येच राहू लागले. आपली राजधानी काशी गमावल्यामुळे राजा दिवोदास खूपच दुःखी झाला. त्याने क ठोर तपश्चर्या करून भगवान ब्रम्हा कडे वरदान मागितले.
देवांचे देवलोकात वास्तव्य असावे, भुलोका म्हणजेच पृथ्वी मनुष्यासाठी राहावे. निर्माते ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु! परिणामी भगवान शिवांना आणि देवतांना काशी सोडण्यास भाग पडले. शिव मंदार आंचल पर्वतावर गेले… पण काशी वरील त्यांचे आकर्षण कमी झाले नाही. सूर्यदेव, ब्रम्हा आणि नारदांनी 64 यो गिनी महादेवाला आपल्या प्रिय काशीमध्ये पुनर्वसित करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
शेवटी गणपती च्या मदतीने ही मोहीम यशस्वी झाली. अशी सूचना मिळाल्यामुळे राजा दिवोदास परत दुःखी झाला. त्यांनी स्वतः शिवलिं गाची स्थापना केली. त्यांची पूजा केली आणि नंतर ते विमानात बसून शिवलोकात गेले. आणि महादेव परत काशीला आले. तसेच अशी सुद्धा एक अख्यायिका प्रचलित आहे की, कैलासावर भस्म पासून राहणाऱ्या शंकराची सर्वजण टिं गल करायचे म्हणून पार्वतीने, मला कोणी चि डवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला.
अशी विनवणी शंकराला केली. त्यामुळे शंकर काशी येथे येऊन राहू लागले. या अशा काही काशी विश्वनाथच्या अख्यायिका आहेत. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा