कां टो को मत निकाल, चमन से ओ बागबा, ये भी गुलो के साथ पले है, बहार में – बहादूर शाह जफर. तर बहादूर शहा जफर ह्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उतरत्या वयात अनेक साहित्य लिहिले. त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यापैकी हा त्यांचा शेवटचा शेर आहे. आयुष्यभर ऐशो आराम आणि स त्ता गाजवणाऱ्या एका सम्राटाचे ते दुःख आहे, जे ह्या शेर मधून व्यक्त होते.
आपल्याला माहित आहे कि मुगल सल्तनत ही हिं दुस्थानातील सर्वात मोठी अन सर्वात ताकतवर सल्तनत होती. १८५७ च्या लढ्यात इंग्रजांनी मुगल सल्तनत संपुष्टात आणली आणि इंग्रजांविरुद्ध हरल्या नंतर मुगलांचे शेवटचे शहंशाह म्हणजेच बहादूर शाह जफर ह्यांचे नंतर काय झाले? इंग्रजांनी त्यांना कशी वागवणूक दिली ? आणि त्यांचे वंशज त्यांचे मुलं ह्यांचे नंतर काय झाले?
इंग्रजांनी त्यांच्या पूर्ण खानदानाला लढाई नंतर लगेचच सं पवले की आज ही त्यांच्या वंशजापैकी कोणी जी वंत आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासात अस्पष्टच सापडतात. आज आपण अशाच काही गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत. औरंगजेबाच्या मृ त्यूनंतर मोगल सत्तेचा ऱ्हा स होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नंतरच्या काळात मोगलाचे वंशज कोठे होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
पण एका वृत्तपत्रानुसार, एकेकाळी उत्तर हिंदुस्थानावर सार्वभौम सत्ता गा जवणाऱ्या, मुघलांचे वंशज आज मात्र एका झोपडीत राहत असल्याचे सांगितले जाते, हे सत्य आहे. ख्वाजा हसन निजामीने आपले पुस्तक ‘बेगमांत के आंसू’ मध्ये १८५७ च्या ल ढ्याच्या शोकांतिका नमूद केल्या आहेत. त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे की १८५८ मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा मुगल सल्तनतला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आणि त्यानंतर दिल्ली वर क ब्जा केल्या नंतर त्यांनी बहादूर शाह जफर आणि त्यांच्या पूर्ण खानदानाला लाल किल्ल्याच्या एक छोट्याश्या कोठडीत कै द करून ठेवले होते.
कै द केल्या नंतर लगेच थोड्याच दिवसात बहादूर शाह जफर ह्यांच्या २१ मुलांपैकी १८ मुलांना अत्यंत क्रू रपणे मा रून टा कण्यात आले. मा रून टाकलेल्या १८ मुलांपैकी ०३ मुलांचे मुं डके दिल्लीच्या खु नी दरवाज्यावर ल टकवण्यात आले होते, जेणे करून सामन्यां मध्ये ब्रिटिशांची द हशत बसावी आणि पुन्हा कोणीही इंग्रजांविरुद्ध बं ड पुकारण्याची हिम्मत करू नये.
इंग्रजांच्या या क्रू र सं हारानंतर बहादूर शाह जफर ह्यांची फक्त तीनच मुले जी वंत राहिली होती. त्या पैकी एक मिर्झा जवान बक्ष, दुसरा मिर्झा शब्बास आणि तिसरा किस्मत बेग असे होते. ह्यांनीच पुढे मुगल वं श पुढे नेला होता.
बहादुर शाह जफर हा शेवटचा मुगल बादशाह होता 1857 उठाव बसल्यानंतर, इंग्रजांनी त्याची रवानगी ब्रह्मदेशातील रंगून या ठिकाणी केली होती.
पण जफरची इच्छा होती की, अंतिम क्षणी आपण हिं दुस्थानात जावं, आणि तिथेच आपली कबर असावी. पण बहादुर शहा जफरची इच्छा अपूर्ण राहिली, आणि त्याच्या मृ त्यू ब्रह्मदेशातच झाला. कधीकाळी हिं दुस्थानवर स त्ता स्थापन करणाऱ्या मुघलांचे वं शज, मोघली स त्ता नष्ट झाल्यावर, त्यांची मुलं नातवंडं वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली.
तेव्हा यातील कोणी बांगलादेशात तर कुणी अमेरिकेत स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते, यातील एक नातू भारतातील कलकत्त्यामध्ये स्थलांतरित झाला. 2013 साली बहादुर शाह जफरच्या नातू बद्दल माहिती छापण्यात आली, तेव्हा बहादुर शाह जफरच्या पणतुचे निधन झाले होते. त्याची बायको सुलताना बेगम मात्र त्यावेळी जि वंत होती. ही सुलताना बेगम कलकत्त्याच्या शांती वसाहतीत झोपडपट्टीत राहत होती.
तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला सांगितले होते की, ” काही झालं तरी, भीक मागू नको, कारण आपण कधीतरी उत्तर भारतावर राज्य केलेल्या मुघलांचे वं शज आहोत”. सुलताना बेगम यांना ४ मुली व १ मुलगा आहे. त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच लोकांना माहिती समजली की, हे मुघलांचे वं शज आहे. त्याचे वं शज हे दोन खोल्या आणि कॉमन किचन असलेल्या, झोपडीत राहत आहेत.
त्यामुळे त्यांना भांडी रस्त्यावर घासावी लागतात. त्यांना कुणीच मा न देत नाहीत. सर्वजण त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागवतात. त्यांना याचे मात्र फार दु खः होते. आपला पूर्वज औरंगजेब असल्याने त्यांना त्यांची सध्याची परिस्थिती आणि लोकांचा रा ग स हन करावा लागत आहे. कधीकाळी उत्तर भारतावर सत्ता गाजवणाऱ्याचे वं शज आज मात्र एका झोपडपट्टीत राहतात, हे ऐकून एकच म्हणाले पाहिजे- “जैसी करनी वैसी भरनी”.