नमस्कार मित्रांनो, शकुनी महाभारतातील असे एक पात्र आहे ज्याकडे लोक खूपच कुतूहलाने पाहतात. त्याचे कारणही तितकेच रोचक आहे, त्वेषाने व सुडाग्नी घेऊन पे टलेल एक महत्त्वाचं पात्र जे षडयंत्रात अगदी निपुण होत, त्यामुळे हल्ली कुणी अस करताना दिसलं की त्याला शकुनी मामा असेच संबोधतात.
पण ज्याप्रमाणे महाभारतातल्या प्रत्येक पात्राची स्वतःची एक ओळख आहे, त्याचप्रमाणे शकुनीची ही स्वतःची एक ओळख आहे, शकुनी हा गांधार देशाचा म्हणजेच आताचे अफगाणिस्तानचा राजा व धृतराष्ट्राची पत्नी व कौरवांची आई गांधारी हिचा सख्खा भाऊ होता. गांधारी आणि शकुनी यांचे वडील राजा सुबल यांचे स्वतःचे राज्य होते.
एके दिवशी, राजा सुबलने एक यज्ञ आयोजित केला, ज्यामध्ये बरेच पंडित आणि महर्षींना आमंत्रित केले. एका ज्योतिषीने सांगितले की गांधारीच्या नशिबात एक ग्रहदो ष आहे. ज्यामुळे तिचे लग्न होताच तिचा पती काही काळानंतर म रण पावेल. आपल्या एकुलत्या एक मुलीचे असे भविष्य ऐकून राजा सुबलला फार वा ईट वाटले.
आणि मग तिचे भविष्य सुधारण्यासाठी तिचा विवाह एका बकरी बरोबर केला आणि त्या बकरीचा ब ळी दिला गेला ज्यामुळे आपल्या मुलीच संकट दूर होईल असे राजा सुबलला वाटले. काही काळानंतर गांधारीचे लग्न हस्तीनापूरचे महाराजा धृतराष्ट्र यांच्याशी झाले. जो राजा पांडूचा आंधळा भाऊ होता. पण शकुनीला याचा अजिबात आनंद झाला नव्हता.
गांधारीच्या पहिल्या विवाहाबद्दल धृतराष्ट्राला काही दिवसानंतर माहिती झाले. त्याला वाटले की आपल्या बरोबर विश्वासघा त झाला आहे. त्यामुळे त्याने राजा सुबल आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकले. तसेच सांगितले की शंभर सदस्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी दिवसातून फक्त एकदाच अन्न दिले जाईल कारण या परिवाराला ठा र मा रण्याच्या हेतूने ही शि क्षा देण्यात आली.
यावर राजा सुबलने विचार करून निर्णय घेतला की दररोज जर कोणा एकाला मुठभर धान्य खायला मिळाले तर तो जि वंत राहील. अशा प्रकारे याच्या कुळाचा शेवट होणार नाही. पण त्याचा हा मुलगा कोण असेल यासाठी आपल्या मुलांची परीक्षा घेण्याचा विचार केला. त्यांच्यातील सर्वात शहाणा कोण आहे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सूड कोण घेईल?
मग सुबलने एक हड्डी घेतली आणि कुटुंबातील सदस्याला हाडातून एक धागा काढायला सांगितले, ते सर्व या कामात अयशस्वी झाले परंतु शकुनीने दोऱ्याच्या एका बाजूला धान्य बांधले आणि दुसऱ्या बाजूला मुंगीला. मुंगी धान्याचा पाठलाग करत हाडाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि तिच्या मागे तो धागा पण गेला अशाप्रकारे सर्वात लहान राजपुत्र शकुनीने हुशारपणा दाखविला आणि संपूर्ण कुटूंबामध्ये तो वाचला.
मग धृतराष्ट्राने शकुनीला मुक्त केले जी धृतराष्ट्राची सर्वात मोठी चुक होती. कारण कौरवांना शकुनीने महाभारताच्या यु द्धामध्ये ढकलले. त्यांच्या वंश ना शाचा बदला घेण्यासाठी! शेवटी पांडवांनी धृतराष्ट्रच्या एकाही मुलाला जि वंत ठेवले नाही. शकुनीला कोणीच चांगला माणूस म्हणून पाहत नाही.
असे म्हटले जाते की शेवटी शकुनीच्या नशिबात स्वर्ग होता कारण शकुनीने आपल्या कुटुंबावर अन्याय झाल्याचा बदल घेण्यासाठी स्वतःचा जी व गमावला. भारतात एक मंदिर शकुनीसाठी बांधले आहे हे केरळमध्ये आहे.