ऐश्वर्या आज खूप आनंदात होती. आज तिच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता. आज तिच्या आणि अनिरुद्ध च्या लग्नाला दहा वर्षे झाली. तिने त्यांची बेडरूम मस्त सजवली होती. पांढरा बेडशीट त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या, रुममध्ये सर्वत्र फुलाच्या माळा सर्वत्र मंद दिव्यांचे लाईट्स सोबत मंद अत्तराचा शिडकाव, आतमध्ये येताच प्रसन्न करणार वातावरण. आज तिला त्यांच्यामध्ये फक्त एकांत हवा होता.
तिने आज तिच्या मैत्रिणीच्या मदतीने घरीच कॅण्डल लाईट डिनरचे प्लानिग केले होते. इतर दिवशी आपल्या सोबत सगळे असतातच पण आज आपण दोघेच, सगळ्या विचारात ती हरवलेली असतनाच दारावरची बेल वाजते. अनिरुद्धला पाहून ऐश्वर्या गालातल्या गालात हसते. त्याच्या हातातली बॅग घेऊन जाताना हळूच ती लाजते. अनिरुद्ध घरी येताच त्याचा मूड एकदम फ्रेश होऊन जातो.
लाल रंगाची शिफाॅन साडी, काळे स्लीवलेस ब्लाउज, मोकळे केस, कमरेला नाजूक साखळी, हातात हिरवा चुडा घातलेली ऐश्वर्या आज एखाद्या नव्या नवरी सारखी सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला अजूनच घायाळ करते. तिच्या मोहक रुपाच तो तोंडभरून कौतुक करतो. गप्पांच्या ओघात जवळीक करणारे क्षण येतात, ती त्याचा हात घट्ट पकडून ठेवते, त्यला मिठी मा रणार तोच अनिरुद्ध विषय बदलून निघून जातो.
ऐश्वर्या च्या लक्षात त्याचा दुर्ललक्षितपणा आल्याशिवाय राहत नाही, पण ती काही बोलत नाही. ती पुन्हा पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण अनिरुद्ध तिचा हात झटकून बाजूला होतो. डोळे पुसत पुसत ऐश्वर्या जेवणाच्या तयारीला लागते. जेवणानंतर ते दोघे त्यांच्या रूम मध्ये जातात, तिथला नजरा बघून अनिरुद्ध पुरता विरघळून जातो. त्याला आता त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.
हे ऐश्वर्या ओळखते. तो रूम न्याहाळत असताना ती त्याला पाठीमागून घट्ट मिठी मा रते, आता कसा सोडून जाशील मला? असा लाडिक प्रश्न ती त्याला विचारते. अनिरुद्ध घामाघूम होतो. तो तिच्यावर जोरात ओरडतो. सोड ऐश्वर्या, इनफ, आज दिवसभर खूप काम होते सो मला खूप झोप आली आहे. आय नीड रेस्ट नाऊ. मी झोपतो. तू सुद्धा औ षध घेऊन झोप. तिच्याकडे पाठ करून तो झोपून जातो.
ऐश्वर्या मात्र अजूनही त्याच मूड मध्ये असते. ती त्याला उठवण्याचा खोडकर प्रयत्न करते. तरी तो तिला दाद देत नाही. उलट तो डोक्यावर चादर घेऊन झोपी जातो. आता मात्र ऐश्वर्याचा धीर सुटतो. ती बेचैन होऊन बडबड करू लागते,तुझे माझ्यावरती प्रेमच नाही, तुला माझी गरजच नाहीये म्हणून तू माझ्याशी असे वागतोस, तुला बाहेर कुणीतरी दुसरी मिळाली असेल म्हणून तू माझ्याशी असे वागतोस.
आणि आधी उठ आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. कोण आहे सांग दुसरी, मी तुमच्यामध्ये नाही येणार, मला आज काय ते सगळे खरे सांग नाहीतर मी माझे काहीतरी बरे-वाईट करू घेईन. माझ प्रेम आहे तुझ्यावर ऐशू आणि मी फक्त तुझाच आहे. तुला हे समजत का नाही.”अरे पण मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहे, नुसते मिठीत घेऊन झोपवतोस, पण त्यापलीकडे देखील काही इच्छा -अपेक्षा असतील ना?”
तिच्या बोलण्याकडे तो पूर्ण दुर्लक्ष करतो, आपण उद्या बोलू प्लीज? “नाही जे काही असेल ते मला आज समजले पाहिजे. म्हणून ती त्याला उठवते. ” माझी राणी तुझ्याशिवाय कोण नाही माझ्या आयुष्यात, तू झोप शांत, ये अशी जवळ माझ्या. “असा म्हणून तो तिला मिठीत घेतो, चार समजुतीच्या गोष्टी सांगून तिला औ षध देतो आणि झोपवतो.
ती शांतपणे झोपल्यावर तो उठून खिडकी पाशी जाऊन उभा राहिला. त्याला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. लग्नानंतर पाच वर्षांनी ऐश्वर्या आई होणार होती, सगळे आनंदात होते, मात्र काळाला त्यांचा आनंद मान्य नव्हता. सातव्या महिन्यातच तिला कळा सुरु झाल्या, आणि त्याचं बाळ ज न्माला येताच मृ त्यू पावलं. तेव्हा डॉ क्टरांनी तिच्या नाजूक स्थितीची सर्वाना कल्पना दिली.
तिच्या ग र्भाशयाला दु खापत झाली असल्यामुळे ती पुन्हा आई होऊ शकत नाही, जरी तुम्ही तसा प्रयत्न केला तरी त्यामुळे तिच्या जी वाला धो का निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता ऐश्वर्याचा जी व तुमच्या हातात आहे. त्या दिवसापासून अनिरुद्ध ऐश्वर्याशी जवळीक करत नाही, घरच्यांनी त्याला दुसर लग्न कर म्हणून सांगितलं तरीही, त्याने त्याचं ऐकल नाही.
ऐश्वर्याला रोज औ षध देऊन झोपवाव लागत त्याना मात्र दुसऱ्या दिवशी तिच्या काहीच लक्षात राहत नाही. मग तिला त्या रात्रीबद्दल काहीही सांगितलं तरी ती मान्य करते. उद्या पण हेच कराव लागेल. जगासाठी ती मा नसिक रु ग्ण असली तरी त्याच्यासाठी मात्र ती त्याची पीय पत्नी, त्याची मैत्रीण त्याच सर्वस्व आहे. म्हणूनच तो तिला प्रा णापलीकडे जपतो.